Saturday, July 28, 2012

हैदराबाद भेट ( बंगलोर - हैदराबाद Return - by कार )

हैदराबाद भेट ( बंगलोर - हैदराबाद Return - by कार )

बरेच दिवस झाले ही पोस्त टाकीन म्हणत होतो पण काही जमत नव्हत. आज वेळ मिळाला.

बंगलोर वरून हैदराबादला ऑफिस मधील मित्राच्या लग्नाला जायचं होत. आधी ठरलं कि कार भाड्याने घेऊन जाऊ. विचारपूस केली तर ११ रुपये K . M . सांगितलं. सुरुवातीच्या माहिती प्रमाणे येऊन जाऊन साधारण  १२०० K . M . होणार होते. म्हणजे १३२००/-, आम्ही ५ जण (मी, अरुण, विशाल, अभ्रा आणि निरंजन) ,  म्हणजे प्रत्येकी २६००/- . तेही फक्त कार चे ? विचार बदलला. म्हटलं बस ने जाऊ. पण सगळे राजे. बस ने कोण जाणार. कार नेच जायचं. मग काय मित्राची कार काढली.

ऑफिस ला फक्त एकच दिवस सुट्टी टाकू शकत होतो. मग रात्रीच ड्राईव कारण आल. लग्न बुधवारच होत. मंगळवारी संध्याकाळी निघायचं ठरलं. बुधवारी लग्न आणि संध्याकाळी निघून रात्री उशिरा किंव्हा गुरुवारी पाहते परत यायचं. म्हणजे ऑफिस ला गुरुवारी जाता येईल. मग काय मस्त प्लान झाला. दोन option होते कार मध्ये. Accent किंव्हा मारुती Wagon r . मित्राला सांगितले जी गाडी जास्त average देते ती आन. मग काय Wagon r .

त्यात कार चालवता येणारे २ नच ( अरुण आणि  विशाल ). आळीपाळीने कार चालवायचे ठरलं. आणि निघालो एकदाचे ऑफिस नंतर संध्याकाळी ४ वाजता.  रस्ता मस्त होता. average स्पीड ९०+ . म्हटलं ६०० K . M . जायला जवळजवळ ७ तास आणि जेवायला आणि थोडा आराम करून म्हटलं तर ९ तास. म्हणजे रात्री १ पर्यंत पोहोचू सहज.
पण पुढे काहीतरी वेगळच वाढून ठेवलं होत. हैदराबादला पोहोचल्यावर मित्राला फोने केला तर तो बोलतो हैदराबाद वरून पुढे २०० K . M . आहे. पहिला झटका बसला. रात्रीचा १ वाजला होता. तसा अंदाज बरोबर होता किती पर्यंत पोहोचू त्याचा.  पुढे कस यायचं ते विचारलं. पण पुढे गेल्यावर मित्राने सांगितल्या होत्या त्या खुणा मात्र मिळत नव्हत्या. मग आम्ही समजलो कि आम्ही रस्ता चूकलो होतो. मित्राकडे mobile मध्ये GPS होत. ते सुरु केल. पण त्याला पण network  मिळत नव्हत. तो पर्यंत रात्रीच ३ वाजले होते. आता रात्री कोण सांगणार रस्ता. रस्त्याला कुत्र पण नव्हत अस काही म्हणता नाही येत कारण तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच वेळाने एक  माणूस भेटला. त्याने सांगितलं कस जायचं ते.

कार मध्ये जे मागे बसले होते त्यांच्या पैकी मधे बसेल त्याची अवस्था जरा वाईट च होत होती. सीट अखंड नव्हती. ती joint होती. म्हणजे बराच वेळ बसलं कि मधे बसलेल्याची  सीट सुन्न ..... ;)

एकदाचे सकाळी ५.३० ला पोहोचलो. ज्याच लग्न होत तो मित्र आम्हाला घ्यायला आला होता. रहायची सोय हॉटेल मध्ये केली होती. जाऊन झोपलो पण तेही फक्त २ तास. ८ वाजता उठलो पटकन तयारी केली आणि लग्नाला गेलो. मित्राबरोबर stage वर फोटो काढून घेतला प्रूफ म्हणून कि आम्ही खरच गेलो होतो लग्नाला.

लग्नावरून दुपारी १ वाजता निघालो. हॉटेल मधून check out केल. आणि निघालो परत हैदराबाद ला. संध्याकाळी ५ ला पोहोचलो. प्रत्येकाला काहीना काही खरेदी करायचं होत. मी Pearls चा हार घेतला.  एवढा प्रवास केला होता. त्यात झोप नाही झाली. म्हटलं जाऊदे ... एक दिवस आणखी ऑफिस मध्ये नाही गेल तर काय बिघडणार आहे. म्हणून हैदराबाद मधेच राहायचं ठरलं. हॉटेल ची चौकशी केली तर सगळी हॉटेल महाग. मग ठरलं कि hyadrabadi  बिरीयानी खाऊ आणि पुढे कर्नुल ला जाऊन राहू. निरंजन बोलला कि हॉटेल Paradise ची बिरीयानी famous  आहे. त्याला माहिती होत कस जायचं ते. निघालो. आता येईल आता येईल करता १ तास नुसते फिरत होतो. पोटात कावळे ओरडत होते आणि आम्ही निरंजनला. एकदाच हॉटेल मिळाल आणि बिरीयानीवर ताव मारला. वा...झक्कास !!! होती बिरीयानी.

पोट भरल्यावर निघालो कर्नुल च्या दिशेने. झोप सगळ्याना येत होती. मी अणि अरुण पुढे बसलो होतो. आमच्या पुढे दोन वोल्वो बस ची race लागली होती. काय चालवत होते ते बस ड्राईवर. आम्ही पण टेंशन मधे. झोप येऊ नये म्हणून फुल volumn मधे गाणी लावली होती आणि मोठ्याने म्हणत पण होतो. एकदाचे रात्री 2 वाजता कर्नूल ला पोहोचलो. होटेल शोधले अणि झोपलो. 


सकाळी आरामात आवरून  निघालो bangalore च्या दिशेने. वाटेत लेपाक्षी म्हणून एक ठिकाण आहे. तिथे शंकराचे सुंदर मंदिर आहे. मंदिरा समोर एक 15 फूट उंच नंदी पण आहे.

लेपाक्षी मंदिर  




नंदी - लेपाक्षी मंदिर
 

वाटेत एक इस्कोन temple पण लागले. ते बहेरुनच बघावे लागले, कारण आम्ही पोहोचलो तेव्हा ते बंद होत.


इस्कोन  मंदिर 


येउन जाउन टोल लाच 1000 रुपये खर्च झाला.  पण मजा आली. आता एवढ्या मित्रांपैकी आम्ही 5 जणच गेलो होतो लग्नाला आणि खर्च पण खूप झाला होता मग काय गिफ्ट मधे आन्ही contribute नाही केल. इतर मित्र सहमत नव्हते आमच्या ह्या वागण्यात पण आम्ही म्हणालो की लग्नाला जाण महत्वाच होत. शेवटी नाहीच दिल आम्ही contribution.

एकंदरीत काय पिकनिक मस्त झाली.